Description
अमेरिकेहून परत आल्यावर स्वामी विवेकानंदांनी कोलंबो ते अल्मोर्यापर्यंत अनेक शहरांमध्ये विभिन्न विषयांवर व्याख्याने दिली. मद्रास येथे ‘The Future of India’ या विषयावर त्यांनी इंग्रजीत जे व्याख्यान दिले त्याचाच प्रस्तुत पुस्तक हा मराठी अनुवाद आहे. स्वामी विवेकानंदांचे भारतावर अपार प्रेम होते आणि या प्रेमामुळेच भारताचे भवितव्य उज्ज्वल व्हावे आणि भारताला जगात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे असे त्यांना हृदयाच्या अगदी अंतस्तलापासून वाटे. त्यांच्या मते धर्म हा भारताचा प्राण असून धर्मामधील शाश्वत सत्यांच्या आधारावर भारतामध्ये पुनरुत्थान घडवून आणले पाहिजे.
Contributors : Swami Vivekananda, S.V. Atre